|
सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख
व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच
सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्हा हा आधी रत्नागिरी
जिल्ह्याचा भाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ठेवण्यात आलं.
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात
आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ कि. मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. प्रमुख मासेमारी
बंदरे (८) - विजयदुर्ग, देवगड, आचार, मालवण, सर्जेकोट, कोचरा, वेंगुर्ला आणि शिरोडा.
मच्छिमार लोकसंख्या - २५३६५ उत्पादन - १९२७३ मे. ट. मच्छिमार सहकारी संस्था - ३४ (एकूण
सभासद १४२१६)
|
|
|
|